रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ नाटककार, कवी, लेखक प्रेमानंद गज्वी यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात दि. २८ जून रोजी हे व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी प्रेमानंद गज्वी यांच्या मराठी नाट्यसृष्टीतील योगदानाचा आढावा घेतला.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पे्रमानंद गज्वी यांनी बंगालमधील यक्षगानपासून प्रेरीत मराठी नाटकांच्या प्रारंभापासून अलीकडील नाटकांपर्यंतचा लेखाजोखा मांडला. ते पुढे म्हणाले, समाजातील सर्वच घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळेच साहित्याच्या क्षेत्रात यातील कोणताही घटक वजा करणे योग्य ठरणार नाही. आज मराठी साहित्याला स्वतंत्र नाट्यनिर्मितीची आवश्यकता आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर घडणाºया विविध घडामोडींचे संदर्भ मराठी साहित्यात यायला हवेत. तरच मराठी साहित्य समृद्ध होईल. आज जे विकते तेच पिकविण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. मात्र असे करताना सौंदर्य कुरूपतेच्या सीमा ओलांडणार नाही याचे भान राखले पाहिजे, असे परखड मतही गज्वी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. किशोर सुखटणकर यांनी विविध दशकातील नाटकांचे आणि बदलत्या संदर्भांचे बहुआयामी मार्गदर्शन केल्याबद्दल प्रेमानंद गज्वी यांचे आभार मानले. तसेच महाविद्यालयात अभिजात नाटकांचा महोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात दि. २८ जून रोजी हे व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. गोपाळे यांनी प्रेमानंद गज्वी यांच्या मराठी नाट्यसृष्टीतील योगदानाचा आढावा घेतला.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पे्रमानंद गज्वी यांनी बंगालमधील यक्षगानपासून प्रेरीत मराठी नाटकांच्या प्रारंभापासून अलीकडील नाटकांपर्यंतचा लेखाजोखा मांडला. ते पुढे म्हणाले, समाजातील सर्वच घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळेच साहित्याच्या क्षेत्रात यातील कोणताही घटक वजा करणे योग्य ठरणार नाही. आज मराठी साहित्याला स्वतंत्र नाट्यनिर्मितीची आवश्यकता आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर घडणाºया विविध घडामोडींचे संदर्भ मराठी साहित्यात यायला हवेत. तरच मराठी साहित्य समृद्ध होईल. आज जे विकते तेच पिकविण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. मात्र असे करताना सौंदर्य कुरूपतेच्या सीमा ओलांडणार नाही याचे भान राखले पाहिजे, असे परखड मतही गज्वी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ. किशोर सुखटणकर यांनी विविध दशकातील नाटकांचे आणि बदलत्या संदर्भांचे बहुआयामी मार्गदर्शन केल्याबद्दल प्रेमानंद गज्वी यांचे आभार मानले. तसेच महाविद्यालयात अभिजात नाटकांचा महोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment