ज्ञानपीठ
पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात
मराठी विभागाच्या वतीने कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित
विंदांच्या समग्र साहित्य निर्मितीचे दर्शन घडविणारा 'स्वच्छंद' हा कार्यक्रम दि. ११ऑक्टोबर
२०१७ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या
राधाबाई शेट्ये सभागृहात सादर झाला.
ज्ञानपीठ
पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने राज्य
मराठी विकास संस्था प्रायोजित व वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित स्वच्छंद
या कार्यक्रमाचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वसंतराव
आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वामन पंडीत, अनिल फराकटे, प्रसाद घाणेकर,माधव गावकर
आणि हर्षदा दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
या
कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर यांची तर निर्मिती संकल्पना वामन पंडित यांची होती. यासाठी संगीत संयोजन माधव
गावकर यांचे होते. शेक्सपिअरच्या किंग लिअरचे भाषांतर करताना त्यातील पंचखंडी प्रवेशाचे
विंदांनी चतुष्खंडी मुक्तछंदात रुपांतर केले. त्या प्रवेशाचे वामन पंडित यांनी केलेले
अभिवाचन सर्वांनाच भावले. यासह विंदांच्या गणेशस्तवन, ट्रंक, तेच ते, मानवांनो आत या
रे यांसारख्या लोकप्रिय कविता, बालकविता, चुटके, त्यांच्या लघुनिबंधामधील आम्रयोग,
अमृतानुभवातील ओव्या, आततायी अभंग या कार्यक्रमात सादर झाले. त्याचप्रमाणे विंदांनी
त्यांच्या अष्टदर्शनमधून सात पाश्चात्य तत्वज्ञ आणि भारतीय तत्वज्ञ चार्वाक यांचे जे
दर्शन घडविले आहे. त्याची झलकही या कार्यक्रमात पहायला मिळाली. या सुरेख सादरीकरणाला
रसिकांच्या टाळ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील
प्राध्यापक, विद्यार्थी आणि रत्नागिरी शहरातील रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वामन पंडित यांचे स्वागत करताना डॉ. किशोर सुखटणकर |
विंदा करंदीकर यांच्या कवितांचे सादरीकरण करताना वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कलाकार |
No comments:
Post a Comment