Tuesday 7 January 2020

गो.जो.महाविद्यालयात डॉ. अरुणा ढेरे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद


           “आपण जे पाहतो त्यापेक्षा अधिक डोळसपणे साहित्यिक पाहतो. त्या सजगतेतूनच त्याचे साहित्य जन्मते. लिहिण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण व अधिकाधिक वाचन हवे.” असा प्रेमळ सल्ला डॉ. अरुणा ढेरे यांनी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला. औचित्य होते मराठी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे. दिनांक ७ डिसेंबर २०१९ रोजी महाविद्यालयाच्या डॉ.ज.शं.केळकर सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
         ज्याचे आपण साहित्य वाचतो त्या साहित्यिकाला ‘याची देही याची डोळा’ अनुभवता यावे यासाठी ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता मराठी विभाग व वाङ्मय मंडळातर्फे राबविला जातो. विद्यार्थांशी संवाद साधताना ‘कविता आकलन व आस्वाद’ याचे अनेक पदर डॉ. अरुणा ढेरे यांनी उलगडून दाखविले. कविता रचनेत महत्त्वाचा असतो तो ‘कवितेचा घाट ’ हे समजावून सांगताना त्यांनी कुसुमाग्रज यांच्या ‘आगगाडी आणि जमीन’ या कवितेचे सादरीकरण केले.
        कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर डॉ.अरुणा ढेरे यांच्यासह कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये , वाङ्मय मंडळ तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निधी पटवर्धन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.कल्पना आठल्ये यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.


ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती अरुणा ढेरे यांचे स्वागत करताना मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, व्यासपीठावर उपस्थित कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, सूत्रसंचालन करताना डॉ. निधी पटवर्धन.



विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. अरुणा ढेरे



No comments:

Post a Comment

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

 गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त  दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'स्...